शहर हुतात्म्यांचे

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात सोलापुरातील कामगार वर्गाने फार मोठा संघर्ष केला आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 पूर्वी सोलापूर शहर ब्रिटिशांच्या नियंत्रणाबाहेर गेले होते. दिनांक 9, 10, 11 व 12 मे 1930 च्या दुपारपर्यंत सोलापूर मुक्त होते. 12 मे 1930 ला ब्रिटिश सरकारने मार्शल लॉ पुकारला. या लष्करी कायद्याच्या आधारे अनेक निरपराध व्यक्तींना शिक्षा करण्यात आली व ठार करण्यात आले.

सोलापूरचे स्वातंत्र्य आंदोलन चिरडण्यासाठी ब्रिटिशांनी मल्लप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी, जगन्नाथ भगवान शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन व श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा यांना 12 जानेवारी 1931 रोजी फाशी देण्यात आली. स्वातंत्र्य आंदोलनासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन सोलापूरचे हे चार हुतात्मे अजरामर झाले. सोलापूरच्या बस स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर हुतात्मा चौकात या चौघांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. याच ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या इतिहासावरून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सोलापूरचा उल्लेख शोलापूर असा करीत असत.

स्वातंत्र्य मिळण्याआधीच म्हणजे 9 ते 12 मे 1930 या कालवधीत सोलापूरने 4 दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरच्या 24 देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

मल्लप्पा धनशेट्टी

स्वातंत्र्य चळवळीच्या धगधगत्या यज्ञकुंडात स्वतःची आहुती देऊन मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा झाले. त्यांच्या अस्थी त्यांच्या सहकार्‍यांनी जपून ठेवल्या होत्या. त्या आजही त्यांच्या जोडभावी पेठेतील स्मारकात आहेत.

जगन्नाथ शिंदे

कामगार संघटनेत सक्रिय होते. 1857 ची स्मृती, बारडोली विजय दिन या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ते राहत होते त्या चौकाला शिंदे चौक असे नाव दिले आहे. प्रेस अ‍ॅक्टच्या जाचक अटींबाबत परखड भूमिका मांडली होती.

श्रीकिसन सारडा

1910 पासून लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली सक्रिय सहभाग. सारडा हे धनाढ्य व्यापारी होते. लोकमान्यांच्या सोलापुरात सभा घेण्यासाठी प्रबोधन व आर्थिक मदत करत. 1915 साली त्यांनी मोठे योगदान लोकमान्य टिळक यांच्याकडे दिले होते.

कुर्बान हुसेन

लक्ष्मी विष्णू मिलमध्ये कामगार होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. अंत्रोळीकर यांचे ते शिष्य. ते ङ्गगजनफरफ नावाचे साप्ताहिक चालवत. कवी कुंजविहारी यांची कविता ङ्गभेटेन नऊ महिन्यांनीफ याच साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाली होती.

स्वातंत्र्यसंग्रामात प्राणाची आहुती देणारे सोलापुरातील हुतात्मे

  •  मोतीचंद परमचंद शहा
  •  दगडू तात्या कवले
  •  सदाशिव श्रीधर कुलकर्णी
  •  तात्या आवबा जाधव
  •  नारायण तुळशीराम
  •  नरसय्या कृष्णय्या त्यारला
  •  भोलागिरी बुवा
  •  गंगाराम भडंगे
  •  फतुसाहेब आवाजी
  •  कालिदास ओधवजी मिठाईवाला
  •  तुकाराम व्यंकप्पा कमटम
  •  गजाभाऊ काशिनाथ रानडे
  •  भानुदास तुळशीराम लोहार
  •  रतनलाल हिराचंद शहा
  •  शंकर सिद्रामप्पा शिवदारे
  •  सुंदरसिंग गुरुदाससिंग
  •  गंगाराम साबळे
  •  मल्लिकार्जुन स्वामी
  •  भाऊ रेवप्पा हुल्ले
  •  इरप्पा

हुतात्मा सोलापूर के चार

इतिहास में जगह तक नही!

रक्त मे लावा नही है हम में

पन्ने खंगालने की भूख नही!!

-विठ्ठल रणदिवे

Share: